ज्या मोजक्या कवयित्रींनी मराठी कवितेचा स्वर ठळक केला, त्यात सुमती लांडे यांच्या कवितेचा आवर्जून समावेश करावा लागेल
दु:खाचा मनस्वीपणे स्वीकार आणि एकटेपणाचा समंजसपणे स्वीकार हे आशयतत्त्व असलेल्या सुमती लांडे यांची कविता अल्पाक्षरी रूपबंधातून अर्थाची खोली प्राप्त करून देत कवितेला एका उंचीवर घेऊन जाते. दुःखाचा कुठलाही आकांत न करता, दुःख पचवूनही जीवनाला नकारात्मक ओरखडा न लावता संयतपणे, परिपक्वतेने दुःख भोगण्याची नजाकत सुमती लांडे यांच्या अनेक कवितांतून प्रकट होते.......